Headlines

मुंबईच्या वेशीवर बांधण्यात येतंय आणखी एक धरण, महाराष्ट्रात आणखी एक धरण होत आहे. मुंबईच्या वेशीजवळच या धरणाचे काम सुरू आहे. एकदा का हे धरण पूर्ण झाल्यास मुंबईला अधिक क्षमतेने पाणी पुरवठा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे ‘गारगाई धरण प्रकल्पासंदर्भात’ आढावा बैठक पार पडली. गारगाई धरण प्रकल्पाचे काम मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.  पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित पुनर्वसन, वनीकरण आणि उभारणीच्या कामांना गती देण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. तसंच, मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्यात आली असून, मे 2029 पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गारगाई धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्राच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्यै काय? 658 हेक्टर बुडीत क्षेत्रात वनजमीन जात असल्याने 1400 हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच बुडीत वनक्षेत्रासाठी वनविकासाकरिता वन विभागाला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जमीन देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 844 हेक्टर जमीन बाधित होणार असून, त्यामध्ये 186 हेक्टर खासगी जमीन आणि 658 हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात एकूण 805 हेक्टर जमीन येणार आहे. प्रकल्पामुळे ओगदा आणि खोडदे ही दोन गावे पूर्णतः, तर पाचघर, तिळमाळ, फणसगाव आणि आमले ही 4 गावे अंशतः बाधित होणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹3065 कोटी असून, त्यामध्ये धरण, जलबोगदा, पुनर्वसनासाठी आवश्यक 22 पायाभूत सुविधांची निर्मिती तसेच वीज निर्मिती संचाचा समावेश आहे. याशिवाय जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, पर्यायी वनीकरण, वृक्षांचे निव्वळ वर्तमान मूल्य, सल्लागार सेवा आदी बाबींवरील खर्च कंत्राटी खर्चापेक्षा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त होत असून, केंद्रीय जनजातीय मंत्रालय (MoTA), राष्ट्रीय भूकंप संकल्पन मानक समिती यांच्यासह गारगाई धरण प्रकल्पाच्या संकल्पचित्रास तांत्रिक मंजुरी आणि पर्यावरणीय परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाच्या मंजुरीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. यासंदर्भात पुनर्वसन आणि पर्यावरणीय उपाययोजनांवरही विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काय आहे प्रकल्प? गारगाई धरण हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाई नदीवर बांधण्यात येणार आहे. या धरणामुळं वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर, घोडसाखरे या सहा गावांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. ओगदा आणि खोडदे गावांच्या स्थलांतरातून मिळालेल्या क्षेत्रावर प्रकल्पाची बांधणी होणार आहे. तसंच, उर्वरित जागेचा वापर वनीकरणासाठी केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाइन

महाराष्ट्रात आणखी एक धरण होत आहे. मुंबईच्या वेशीजवळच या धरणाचे काम सुरू आहे. एकदा का हे धरण पूर्ण झाल्यास मुंबईला अधिक क्षमतेने पाणी पुरवठा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे ‘गारगाई धरण प्रकल्पासंदर्भात’ आढावा बैठक पार पडली. गारगाई धरण प्रकल्पाचे काम मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पालघर…

Read More

धावत्या ट्रेनमधील एसी कोचमध्ये प्रवाशाने पूजेसाठी पेटवला दिवा; पुढच्या क्षणी अख्खा डबा…; VIDEO व्हायरल, रेल्वेने काय म्हटलं?

ट्रेनमध्ये प्रवाशांना सुरक्षेसंदर्भाती सर्व काळजी घेण्याचं आवाहन वारंवार रेल्वेकडून केलं जात असतं. मात्र मागील काही दिवसांमध्ये प्रवाशी आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका प्रवाशाने एसी डब्यात पूजा करण्याच्या हेतूने चक्क दिवा पेटवला होता. व्हिडीओत प्रवासी एसी डब्यात वरच्या सीटवर बसलेला दिसत…

Read More

PoK elections: 20 killed in Pakistani Rangers and Frontier Corps firing; 38 injured as violence and rigging dominate voting

Violence, allegations of electoral rigging, and the killing of a political worker cast a shadow over the first phase of elections in Pakistan-occupied Kashmir (PoK) on Monday. Coalition partners in Pakistan’s federal government accused each other of undermining the electoral process, according to local media reports. At least 20 people were killed in Pakistani Rangers…

Read More

बुमराह-सुदर्शन पर सस्पेंस, सुंदर-रेड्डी बाहर… श्रीलंका के खिलाफ टीम इंडिया का ऐलान, 33 साल के नए ऑलराउंडर को मौका

जिम्बाब्वे दौरा खत्म होते ही भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने श्रीलंका दौरे के लिए टेस्ट टीम का ऐलान कर दिया है. इंडियन टीम में इंजरी कंसर्न देखने को मिला है. नितीश रेड्डी और वाशिंगटन सुंदर बाहर हो गए हैं जबकि 33 साल के नए ऑलराउंडर को टीम में मौका मिला है. स्टार गेंदबाज जसप्रीत…

Read More

डान्स बार बंद पण ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील डान्स सुरुच; फडणवीसांचा मोठा निर्णय; यापुढे…

राज्य सरकारने बार, हॉटेल आणि मद्यपान कक्षांमध्ये ‘ऑर्केस्ट्रा’च्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 अंतर्गत प्रत्यक्ष संगीत सादरीकरण (ऑर्केस्ट्रा) परवाने देण्यात येणार नाहीत. तसेच, यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या ऑर्केस्ट्रा परवान्यांचे नूतनीकरणही केले जाणार नाही. याबाबतचे आदेश देवेंद्र फडणवीसांकडे कारभार असलेल्या गृह…

Read More

एक और बड़ा आंदोलन! CJP के बाद E20 जनता पार्टी ने किया संसद मार्च का ऐलान

एथनॉल मिले पेट्रोल यानी E20 के खिलाफ चल रहा विरोध अब एक नए राजनीतिक और सामाजिक अभियान का रूप लेता दिखाई दे रहा है. E20 जनता पार्टी नाम से चल रहा यह अभियान इन दिनों तेजी से चर्चा में है. पार्टी ने संसद तक मार्च करने का ऐलान किया है. इसकी तुलना कॉकरोच जनता पार्टी…

Read More

दिल्ली मेट्रो के 16 स्टेशन बंद करने पर सुप्रीम कोर्ट सख्त, CJI सूर्यकांत बोले- ‘अगर लंच के समय तक…’

कॉकरोच जनता पार्टी के जंतर-मंतर पर चल रहे प्रदर्शन को देखते हुए दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यानी DMRC ने 16 स्टेशनों को बंद करना का ऐलान किया था. दिल्ली मेट्रो ने कल यानी 22 जुलाई को भी इन स्टेशनों को बंद रखा था. अब इस पर सुप्रीम कोर्ट सख्त हो गया है. दिल्ली मेट्रो स्टेशनों…

Read More