देश,राजनीति
पॉवेलबाईंची गच्छंती
राजकारण हे कधी सरळ रेषेत चालत नसते. ते वेडीवाकडी वळणे घेत असते, पण त्याची ही वळणे कुठे असतील आणि अचानकपणे आपल्यापुढे कधी येतील, हे माहीत नसले की भल्याभल्यांची भंबेरी उडते. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल या खरे तर व्यावसायिक राजकारणी. त्यांना अशी वळणे कशी हाताळावीत, हे माहीत नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण, तरीही भारत आणि अमेरिका यांच्या संबंधात आलेल्या एका अवघड वळणाने त्याना इतके चकवून टाकले की त्यांना अध्र्यातच आपला डाव सोडून जावे लागत आहे. खरे तर भारतात अमेरिकेचे अनके नामवंत राजदूत आपली कारकीर्द गाजवून गेले. दोन्ही देशांत बराच काळ राजकीय तणाव असूनही गॉलब्रेथ, चेस्टर बोल्स, केनेथ किटिंग अगदी अलीकडे फ्रॅँक वाईजनर, रॉबर्ट ब्लॅकविल यांनी अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या भारताविषयीच्या पूर्वग्रहांना दाद न देता दोन्ही देशांचे संबंध केवळ चांगले राहतील हे तर पहिलेच, पण भारतीय मानसिकता व संस्कृती अमेरिकन प्रशासनाने समजून घ्यावी, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे दोन्ही देशांत तणाव असूनही तो कधी ताणला गेला नाही. पण नॅन्सी पॉवेल यांच्या काळात दोन्ही देशांत सर्वाधिक चांगले संबंध असताना अगदी